Thursday, May 5, 2011

पुण्यातील बेताल दुचाकीस्वार


काल परवा सकाळ सकाळचीच गोष्ट. मी नेहमीप्रमाणे  ऑफिसला निघालो होतो. सेनापती बापट रोडवर पॅन्टलुन च्या चौकात सिग्नल ला थांबलो. रेड सिग्नल होता... ग्रीन झाला... गाडीला किक मारुन निघालो.....ईतक्यात ऊजवीकडुन ओम सुपर मार्केट चौकातुन एक बाईकस्वार अचानक सिग्नल तोडुन आम्हाला क्रॉस करुन वेगाने निघुन गेला. किर्र र्र र्र.......  सर्वांनी जागीच ब्रेक दाबले. आम्ही सगळे जागीच थबकलो. अपघात होता होता वाचला. हिरवा सिग्नल लागल्यामुळे आम्ही नुकतेच निघालो होतोच तेवढ्यात  .......?????  आणि हे सर्व इतक्या कमी वेळेत घडल्यामुळे वाहतुक नियंत्रकाला सुद्धा त्याच्या गाडीचा नंबर पाहाता आला नाही. इतका बेदरकारपणा ? कुठे चाललिय हि आजची तरुणाई ? अशा बेताल दुचाकिस्वारांना कोणी धडा शिकवील काय? अशा रायडर्स मुळे सामान्य नागरिकांचे रस्त्यावर चालणे धोक्याचे झाले आहे.... यावर कोणी काही उपाय सुचवील काय ?

No comments:

Post a Comment